Ad will apear here
Next
अमिश त्रिपाठी, विनायक चिंतामण वैद्य


आपली नवी कोरी इंग्लिश कादंबरी प्रकाशित होण्याआधी ‘वेस्टलँड’सारख्या प्रकाशकाकडून १० लाख रुपये अॅडव्हान्स मानधन मिळवणारा तरुण कादंबरीकार अमिश त्रिपाठी आणि लोकमान्य टिळकांकडून ‘भारताचार्य’ उपाधी मिळवणारे विनायक वैद्य यांचा १८ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये दोघांचा अल्प परिचय...
...........
अमिश त्रिपाठी 

१८ ऑक्टोबर १९७४ रोजी मुंबईत जन्मलेला अमिश त्रिपाठी हा भारताचा तरुण कादंबरीकार, ज्याच्या पुराणकथांच्या कादंबऱ्यांनी विक्रीचे नवनवे उच्चांक रचले आहेत. 

पहिली कादंबरी प्रकाशित होण्यासाठी २० प्रकाशकांकडून नकार पचवावा लागलेल्या, कोलकात्याच्या ‘आयआयएम’मधून एमबीए केलेल्या या तरुण कादंबरीकाराला आज मात्र त्याची नवी कोरी कादंबरी प्रकाशित होण्याआधी ‘वेस्टलँड’सारख्या प्रकाशकाकडून १० लाख रुपये अॅडव्हान्स मानधन मिळतंय.  
त्याच्या पहिल्या तीन कादंबऱ्या भगवान शंकराची कहाणी सांगणाऱ्या होत्या, तर चौथी कादंबरी श्रीरामाची कहाणी मांडणारी. या चार कादंबऱ्यांची एकत्रित विक्री ४० लाखांवर जाऊन उलाढाल तब्बल १०० कोटी झाली आहे. त्यांच्या इंग्लिश कादंबऱ्यांचे भारतातल्या दहा, तसंच इतर पाच भाषांत अनुवाद झाले आहेत. 

इंमॉर्टल्स ऑफ मेलूहा, दी सिक्रेट ऑफ दी नागाज, दी ओथ ऑफ दी वायुपुत्राज, सायन ऑफ ईक्ष्वाकु, वॉरिअर ऑफ मिथिला, ऑर्फन ऑफ आर्यावर्त आणि इम्मॉर्टल इंडिया अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 
........ 
विनायक चिंतामण वैद्य

१८ ऑक्टोबर १८६१ रोजी जन्मलेले विनायक चिंतामण वैद्य यांना लोकमान्य टिळकांनी ‘भारताचार्य’ ही उपाधी दिली होती. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास होता. 
दुर्दैवी रंगू, मध्ययुगीन भारत, अबलोन्नती लेखमाला, निबंध आणि भाषणे, मराठी भाषेचा इतिहास, मराठी गद्यरचना, माझा प्रवास असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

 १९०८ सालच्या सहाव्या महाराष्ट्र ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २० एप्रिल १९३८ रोजी त्यांचं निधन झालं. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZUSBH
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language